यावर्षी झालेल्या अतिवृष्टी मुळे मंगरूळ पीर तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यामुळे शासनाने आर्थिक मदत दिली असून ती मदत शेतकऱ्यांना मात्र बँकेने अजूनही वाटप केली नसल्याने ती त्वरित वाटप करण्याची मंगारुळपीर येथील जनसेवक अनिल गावंडे यांनी मागणी केली आहे.

  यावर्षी अतिवृष्टीचा फटका मंगरुळपीर तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला होता.याबाबत अनिल गावंडे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करत बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करण्याची मागणी केली होती.शासनाने आर्थिक मदत जाहीर् करून शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली परंतु शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत बँकेने पैसे दिल नसल्यामुळे शेतकरी अडचजणीत सापडला आहे. बँक मॅनेजर ला पैसे वाटपा संबधी आदेश देण्यात यावे.अन्यथा बँकेसमोर शेतकऱ्यांच भजन आंदोलन करण्यात येईल.अशी मागणी अनिल गावंडे यांनी केली आहे.