रत्नागिरी : भाजप आणि काँग्रेसच्या रेट्याने अखेर आठवडा बाजार ते कॉंग्रेसभवन दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण झाले. ठेकेदाराने रस्त्याचे एवढे निकृष्ट काम केले होते की, अवघ्या चार महिन्यात रस्त्याची वाताहत झाली. रस्त्यात एवढे खड्डे पडले की वाहनधारकांना कसरत करत येथून वाहने चालवावी लागत होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्यादरम्यान तात्पुर्ती मलमपट्टी करण्यात आली होती, तिही काही दिवसात उखडली. दोन्ही पक्षानी हा विषय लावून धरल्यानंतर पालिकेने ठेकेदाराला अंतिम नोटीस बजवाल्यानंतर ठेकेदार वठणीवर आला आणि एका रात्रीत हे काम झाले.

Sponsored

चाणक्य एकेडमी बूंदी (राजस्थान )

बूंदी के सभी विधार्थियो के लिए खुशखबरी...अब 1 जुलाई से चाणक्य एकेडमी फिर से सभी प्रतियोगी परीक्षाओं के नए बैच प्रारंभ करने जा रही है। जिसमे आप CET/पटवार/LDC शिक्षक भर्ती REET सभी भर्तियों के लिए आवेदन कर सकते हैं। अभी प्रवेश पर आपको 30% की छूट दी जाएगी। चाणक्य की अनुभवी फैकल्टी द्वारा आपको अध्ययन कराया जाएगा।

सुधारित पाणी योजना आणि सीएनजी गॅस पाइपलाईन टाकण्यासाठी शहरातील सर्व रस्ते खोदण्यात आले होते. पावसाळ्यापूर्वीच म्हणजे चार महिन्यांपूर्वी शहरातील रस्ते २९ कोटी रुपये खर्च करून करण्यात आले होते. परंतु पहिल्या पावसातच या रस्त्यांची वाताहत झाली. रस्ते करताना शहराचे माळनाक्यापासून वर आणि खाली, असे दोन भाग करण्यात आले. माळनाक्यापासून खाली जाहिद खान या ठेकेदाराला ठेका देण्यात आला होता. या भागातील रस्त्यांचे काम निकृष्ट झाल्यामुळे चार महिन्यात ते उखडले, असा आरोप कॉंग्रेस आणि भाजपने केला. त्यानंतर काही भागात मलमपट्टी झाली. परंतु आठवाड बाजार ते कॉंग्रेसभवन या रस्त्याची अवस्था भयानक झाली होती. या भागातून खड्डे चुकवून वाहन चालविणे म्हणजे तारेवरची कसरतच. त्यामुळे कॉंग्रेसने या रस्त्याविरोधात आंदोलन केली. त्यानंतर श्रमदानातून खड्डे भरण्यात आले. तरी पालिक प्रशासनाला जाग आली नाही. 

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण महामार्गाची पाहणी करून आठवडा बाजार येथील भाजपच्या कार्यालयाला भेट देणार होते. त्यामुळे भाजपणे या रस्त्याविषयी पालिका प्रशासनाला जाब विचारला. त्यानंतर तातत्पुर्ती मलमपट्टी करण्यात आली. मात्र तिही पावसामुळे लगेच धुऊन गेली. ठेकेदाराच्या या भोंगळ आणि निकृष्ट कामाबद्धल भाजप पदाधिकारी आक्रमक झाले. मुख्याधिकाऱ्यांना भेटून तत्काळ या रस्त्याचे काम करण्यास सांगितले. मात्र ठेकेदाराने प्रशासनाला उडवून लावले होते. भाजप आणि कॉंग्रेसच्या रेट्याने पालिकेने ठेकेदाराला अंतिम नोटीस काढल्यानंतर त्याची दखल घेऊन आठवडा बाजार ते कॉंग्रेसभवन हा रस्ता काल करण्यात आला.

अन्यथा अनामत रक्कम जप्त करू 

भाजपने केलेल्या मागणीनुसार ठेकेदाराला नोटीसबाबतचे गांभीय लक्षात न घेता नादुरुस्त झालेल्या रस्त्याचे पुनःश्च डांबरीकरण केलेले नाहीत. सद्यस्थितीमध्ये नादुरूस्त झालेल्या रस्त्याचे काम २८ ऑक्टोबर २०२२ पर्यंत चालू न फेल्यास करारनाम्यातील अट क्र. १६ नुसार आपण भरलेली बयाणा रक्कम व सुरक्षा अनामत रक्कम जप्त करणेचा अधिकार पालिकेला असल्याने सदरची रक्कम जप्त येईल याची नोंद घ्यावी, अशी सज्जड नोटीस पालिका प्रशासनाने ठेकेदाराला दिल्यानंतर मुदतीत रस्त्याचे काम करण्यात आले.