चिपळूण : रत्नागिरीहून दिव्याकडे जाणाऱ्या पॅसेंजरचे पूर्वी संगमेश्वर, चिपळूण व खेड येथे तीन डबे राखीव होते; परंतु कोरोना महामारीच्या काळात हे डबे रद्द करण्यात आले. मात्र, ते आता पूर्वीप्रमाणे सुरू करावे, म्हणजे तोट्यात जाणाऱ्या कोकण रेल्वेला दिलासा मिळेल. कोकण रेल्वे रो रो सेवेवर अधिक लक्ष केंद्रीत करीत आहे, ते त्यांनी प्रवासी वाहतुकीवर द्यावे, म्हणजे उत्पन्न वाढेल; परंतु रेल्वेचे खासगीकरण होऊ देणार नाही असा इशारा कोकण रेल्व अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष, माजी सभापती शौकत मुकादम यांनी दिला र आहे. कोकण रेल्वे प्रशासनाकडे गेले अनेक वर्षे कोकण रेल्व अन्याय न निवारण समिती दादर पॅसेंजर चालू करण्याबाबत मागणी करीत आहे.

तर प्रवासी वाढतील...आणि रेल्वेला फायदा होईल

रत्नागिरी- दिवा पॅसेंजरला पूर्वी संगमेश्वर, चिपळूण व खेडसाठी ती डबे राखीव होते. गाडी सुटताना पूर्वी हे ती डबे आतून कडी लावून बंद करण्यात येत होते व ते ते स्टेशन आल्यावर ते उघडले जात होते. कोरोनाच्या काळात ते डबे प्रवासी कमी असल्याने बंद केले होते; परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहे. त्यामुळे दिवा पॅसेंजरचे हे ती डबे पूर्वीप्रमाणे संगमेश्वर, चिपळूण व खेडसाठी राखीव ठेवावे, म्हणजे प्रवाशांची संख्या वाढून रेल्वेला अधिकचा फायदा होईल. सध्या सर्वच पॅसेंजर फुल असतात. प्रवाशांना बसायला जागाच नसते. दिवा पॅसेंजर दादरपर्यंत न्यावी. रेल्वे प्रशासन रो-रो सेवेकडे जसे अधिकचे लक्ष देते, तसेच लक्ष त्यांनी प्रवासी वाहतुकीकडे द्यावे. रेल्वेतील जेवणाचे दरही अव्वाच्या सव्वा असल्याने सामान्य माणसाला ते परवडत नाहीत, ते कमी करावे. प्रवाशांच्या हितासाठी निर्णय घ्यावेत. मात्र, रेल्वेचे खासगीकरण आम्ही होऊ देणार नाही, असा इशारा मुकादम यांनी दिला आहे.