औरंगाबादचे दोन केंद्रीय राज्यमंत्री , राज्याचे तीन कॅबिनेट मंत्री आणि एक विरोधी पक्षनेता असे सहा जण सरकारमध्ये आहोत . पण एवढी मंत्रिपदे मिळूनही विकास झाला नाही तर या मंत्रिपदाचा काय उपयोग होईल , असा सूर पालकमंत्री , कृषिमंत्री , सहकारमंत्री आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी शनिवारी ( १५ ऑक्टोबर ) व्यक्त केला . आम्ही सर्वजण मिळून औरंगाबादच्या विकासासाठी प्रयत्न करू , असे आश्वासन पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी दिले . जिल्हा बँकेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ . कराड , कृषिमंत्री अब्दुल सत्तार , सहकारमंत्री अतुल सावे , भुमरेंचा सत्कार झाला . बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील , आमदार सतीश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती . केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे , विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निमंत्रण नसल्याबद्दल भुमरे यांनी खंत व्यक्त केली . विरोधी पक्षनेते आमचेच आहेत , असेही ते म्हणाले विमावाले फक्त 10 टक्के देतात नितीन पाटील म्हणाले की , इन बॅलन्सचा प्रश्न केंद्रीय मंत्री अमित शहा तसेच अन्य मंत्र्यांनी मार्गी लावावा . रामकृष्ण उपसा जलसिंचन योजना पूर्ण करून १५ गावांच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा . आमदार चव्हाण म्हणाले की , बँकेला अव्वल करण्यासाठी चारही मंत्र्यांनी हातभार लावावा . विमा कंपन्या ११० टक्के भरपाईचा दावा करतात . प्रत्यक्षात त्या १० टक्केच देतात . विमा कंपनीचे बारावी पास कर्मचारी आपल्या आयएएस अधिकाऱ्यांना कळू देत नाहीत . केंद्राने कृषिमंत्र्यांची बैठक घेऊन ठोस निर्णय घ्यावा . अध्यक्षांचा चेहरा उतरला सत्कार समारंभात सत्तार यांचे भाषण सुरू असताना नितीन पाटील , आमदार चव्हाण आपसात बोलत होते . त्यामुळे सत्तार पाटील यांना चिडून म्हणाले , ' मला तुम्हाला आमदार करायचे आहे , पण तुम्हाला ते कळतच नाही . ' त्यावर चव्हाण यांनी ' आतापासून गाजर दाखवायला सुरुवात केली की काय ? ' अशी कोटी केली . मग सत्तार म्हणाले की , पाटील यांना काही कळत नाही . ही समस्याच आहे . आणि ते तुमचे ( चव्हाण ) तुमच्याच पक्षाचे काम करत आहेत . यामुळे पाटील यांचा चेहरा उतरला , तर चव्हाण लगेच निघून गेले .तसेच सावे म्हणाले की , शेतकरी मेळावा आयोजित करून त्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांना मंत्र्यांनी उत्तरे देण्याचे नियोजन करावे . रामकृष्ण जलसिंचन योजनेसाठी मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार प्रयत्न करू . भुमरे म्हणाले की , देवगिरी , गंगापूरचा सहकारी साखर कारखाना सुरू करणे आवश्यक आहे . डॉ . कराड म्हणाले की , जिल्हा बँकेचा इन बॅलन्सचा प्रश्न केंद्र सरकार एकटे सोडवू शकणार नाही . त्यासाठी स्वतंत्र नियोजन करावे लागणार आहे . तसेच रामकृष्ण जलसिंचन योजनेकरिता बैठक घेऊन तोडगा काढू . कागजीपुऱ्यात लवकरच शेतकरी प्रशिक्षण केंद्र सुरू होणार असल्याची घोषणाही त्यांनी केली
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
બોટાદ ખાતે વ્યાજખોરોના ત્રાસથી મહિલાનો આત્મહત્યાનો પ્રયાસ...
બોટાદ પોલીસ દ્વારા પીડીત મહિલાની ફરિયાદ લઈ કુલ પાંચ આરોપીઓ પૈકી બે આરોપીને અટક કરાઈ..
બોટાદ ખાતે વ્યાજખોરોના ત્રાસથી પીડાતી મહિલાએ આત્મહત્યાનો પ્રયાસ કર્યો હતો અને તેને સારવાર માટે...
Maruti Suzuki Baleno जनवरी 2024 में रही नंबर-1, यहां देखिए पिछले महीने बिकी टॉप-10 कारों की लिस्ट
Maruti Suzuki Baleno जनवरी 2024 में 19630 यूनिट की मासिक बिक्री दर्ज करते हुए सबसे अधिक बिकने...
દીપડો આખરે પાંજરે પુરાયો
કોડીનાર ના પાંચ પીપળવાના સીમ વિસ્તારમાંથી ખુંખાર દીપડો પકડાયો તંત્રએ રાહતનો શ્વાસ લીધો
ગીર સોમનાથ જિલ્લાના ડોળાસા ગામ નજીકના પાંચ પીપળવા ગામની સીમમાં આવેલા ખેડુતની વાડીએ રાખેલા...
BJP Vs Congress: Ram Mandir का असर 2024 के चुनावों पर असर पड़ेगा? | Dwali 2023 | Anjana Om Kashyap
BJP Vs Congress: Ram Mandir का असर 2024 के चुनावों पर असर पड़ेगा? | Dwali 2023 | Anjana Om Kashyap
100% Pure Skincare Products - Make at Home | साफ़ त्वचा पाने के लिए उपाय
100% Pure Skincare Products - Make at Home | साफ़ त्वचा पाने के लिए उपाय