रत्नागिरी : ग्रामपंचायतीच्या निवडणूक क्षेत्रात दि. १५, १६, १७ ऑक्टोबरला मद्यविक्रीला पूर्णतः मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दि. १६ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. दि. १७ ऑक्टोबरला मतमोजणी होऊन अधिकृत निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणुका खुल्या, मुक्त, निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सलग तीन दिवस मद्यविक्री पूर्णतः बंद करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या व्यक्तीवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई केली जाणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षकांनी कळविली आहे.