राजापूर: शहरातील नगर वाचनालय सभागृहात मंगळवारी ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता मोफत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी नामदेव गोंडाळ मो. ९४२२६३६५७३ यांच्याशी संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून शेती शास्त्रज्ञ डॉ. रेवती जाधव, कृषीमित्र निलेश मोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात थ्रिप्स, तुडतुडे, फळमाशी यांचा प्रतिबंधक करणे, आंब्याची फळगळती व साका, खर्च कमी करून आंबा-काजू पिकांमध्ये जास्त उत्पादन कसे घेणे, कणी सेटिंग, फळांचा आकार, कलर चकाकी, काजू - आंबा यामध्ये खोडकिड प्रतिबंध, आंबा, काजू, नारळ, सुपारी, इतर फळझाडे फवारणीमधील किड, बुरशी, आणि व्हायरस या संदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.