बीड (प्रतिनिधी) महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागासवर्ग (ईएसबीसी) व सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) आरक्षण मिळाल्या नंतर मराठा समाजातील तरुणांनी मोठ्या प्रमाणात लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या भरतीसाठी परीक्षार्थीनी परीक्षा दिल्या, यात समाज बांधव नोकरीसाठी पात्र झाले. मात्र सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे या पात्र ठरलेल्या उमेदवारांना नोकऱ्यांपासून वंचित राहण्याची वेळ आली होती. या तरुणांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध शिवसंग्राम चे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय आ. विनायकराव मेटे यांनी सातत्याने पत्रव्यवहार, बैठका आणि विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधण्याचे काम केले विनायकराव मेटे एवढ्यावरच न थांबता त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना दि. ८ डिसेंबर २०२० रोजी पत्र देऊन २०१४ मधील ( ईएसबीसी) आणि २०१८ च्या (एसईबीसी) मधील नोकर भरतीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु उमेदवारांना नियुक्त देता येत नाही याकरिता शासनाने सर्वोच्च न्यायालयात सक्षमपणे भूमिका मांडून या सर्व उमेदवारांना न्याय देण्यासाठी बाजू मांडावी आणि याच्यावरची स्थगिती उठून सुपर न्यूमररी जागेसाठी मान्यता घ्यावी अशी मागणी केली होती. स्व. विनायकराव मेटे यांच्या या सातत्याच्या लढ्याने त्यांच्या पश्चात आता सत्तेत आलेल्या शिंदे - फडणवीस सरकारने दिनांक २१ सप्टेंबर २०२२ रोजी या रखडलेल्या नियुक्त्या संदर्भातील शासन निर्णय काढून एक प्रकारे मराठा समाजातील हजारो तरुणांना नोकरीत सामावून घेण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे १०६४ विद्यार्थ्यांना स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्यामुळे नोकरीचा मार्ग खुला झाला आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सर्व समाज बांधवांच्या वतीने आणि राज्य शिवसंग्राम च्या वतीने आभार मानण्यात येत आहेत.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
पैकेज्ड फूड में बताया जाए शक्कर, नमक और फैट का लेवल, सुप्रीम कोर्ट में क्यों उठी मांग? SC ने केंद्र से मांगा जवाब
नई दिल्ली। सुप्रीम कोर्ट ने पैकेज्ड फूड (पैकेज्ड खाद्य पदार्थ) पर चीनी, नमक व संतृप्त...
યુવાનોને સ્વરોજગારી માટેની અમૂલ્ય તક: ધંધા અર્થે હવે ૮ લાખ સુધીની લોન સહાય મળશે
યુવાનોને સ્વરોજગારી માટેની અમૂલ્ય તક: ધંધા અર્થે હવે ૮ લાખ સુધીની લોન સહાય મળશે
ગુજરાત સરકાર અને...
মুখ্যমন্ত্ৰীয়ে কি আশ্বাস দিলে সদৌ অসম গৰিয়া-মৰিয়া-দেশী জাতীয় পৰিষদৰ বিষয়ববীয়াক?
মুখ্যমন্ত্ৰীয়ে কি আশ্বাস দিলে সদৌ অসম গৰিয়া-মৰিয়া-দেশী জাতীয় পৰিষদৰ বিষয়ববীয়াক?
Delhi Budget LIVE: 29 new flyovers, 1600 new e-buses for national capital
The Delhi budget is being presented by finance minister Kailash Gahlot in the Delhi assembly on...
નીતિન ગડકરીએ નાગપુરમાં નોકરિયાતો પર આકરા પ્રહારો કર્યા, ‘સરકાર અમારા હિસાબે ચાલશે, અધિકારીઓએ માત્ર હા સાહેબ કહેવાનું છે’
કેન્દ્રીય મંત્રી નીતીશ ગડકરીએ મંગળવારે નાગપુરમાં નોકરશાહી પર આકરા પ્રહારો કર્યા હતા. તેમણે કહ્યું...