अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामिण) च्या वतीने स्व. भारतरत्न राजीवजी गांधी यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी भारतरत्न राजीव गांधी यांनी घेतलेल्या अनेक देशहिताच्या निर्णयाबद्दल उजाळा करून देण्यात आला.तसेच विरोधकांना न जुमानता डिजिटल युगाची सुरुवात केली आणि जगात भारत देशाला एका वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवण्याचे काम केले. तसेच पंचायतराज सारखा निर्णय घेऊन त्याचे घटनेत रूपांतर करून सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला.

 यावेळी माजी पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर, माजी आमदार वीरेंद्र जगताप, आमदार बळवंत वानखडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे, प्रकाश काळबांडे, हरिभाऊ मोहड, जयंतराव देशमुख, भैय्यासाहेब मेटकर, संजय मापले, संजय वानखडे, समाधान दहातोंडे, विषाल भट्टड, अमोल ठाकरे, पंकज विधळे,बच्चू बोबडे, नंदकिशोर यादव, विनोद गुडदे, बिट्टू मंगरुळे, भागवत खांडे, संदीप रिठे ,प्रशांत पाटील भोयर हे उपस्थित होते