जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली द्वारा भारत जोडो अभियान अंतर्गत आयोजित "आझादी गौरव पदयात्रा" जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात विसोरा ता.वडसा येथे पोहचली. पाऊस सुरू असताना देखील गावकऱ्यांनी मोठया उत्साहात पदयात्रेचे स्वागत करत पदयात्रेत सहभागी झाले. यावेळी विसोरा गावातून प्रभाफेरी काढून जनजागृती करून भगवान बिरसामुंडा यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रदेश महासचिव तथा माजी आम. डॉ.नामदेव उसेंडी, माजी आम.आनंदराव गेडाम, माजी जि.प.उपाध्यक्ष जिवन नाट, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, वडसा ता.अध्यक्ष परशराम टिकले, राजेंद्र बुल्ले, नितीन राऊत, डॉ.विनोद नाकडे विसोरा चे उपसरपंच संजय करानकर, अभय नाकाडे, मिलिंद खोब्रागडे, अनिल कोठारे, प्रभाकर तुलावी, जावेद खान, गिरीधर तितराम, महादेव कुमरे, श्रीराम दुगा, जावेद शेख, विलास बन्सोड, दादाजी वालदे, जगदीश शेंदरे, विनायक वाघाडे, चैतनदास चंदनबटवे, बेनिराम उईके, अमृत ठाकरे, प्रल्हाद वाघडे, महादेव बुदे, माजी सरपंच दुर्गाबाई वरखेडे, चंद्रभागा वरखेडे, जिजा मडावी, विश्रांती बुद्धे, पुष्पा कन्नके सह शेकडोंच्या संख्येने महिला, पुरुष व काँग्रेस कार्यकर्ते यावेळी पदयात्रेत उपस्थित होते.