राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद अनिल पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांचे मन परिवर्तन करण्याचा प्रतत्न सुरू आहे. किमान २०२४ च्या निवडणुका होईपर्यंत तरी राजीनामा देवू नका, अशी विनंती शरद पवार यांना केली आहे, असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देताना आम्हाला विश्वासात का घेतलं नाही? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच आव्हाड यांनी आपल्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला असून ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. जितेंद्र आव्हाड मुंबईतील बैठकीला देखील उपस्थित राहिलेले नाहीत. शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.