आवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे पुन्हा नुसकान..

..कन्नडमध्ये विज पडून एका बैलाचा मृत्यू 

- छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील देवळी, चापानेर या परीसरात दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट पावसाने हजेरी आहे. आठ दिवसापूर्वीच कन्नड तालुक्यातील विविध भागांमध्ये गारपीट होऊन शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यात पुन्हा एकदा देवळी येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्यांचे बैल बाभळीच्या झाडाखाली बांधलेले असता त्यावर वीज पडून बैल जागेवर ठार झाला तर दुसरा गंभीर जख्मी झाल्याची घटना घडली आहे.या घटनेत शेतकऱ्यांचे साठ हजारांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी, महसुली कर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर डॉ.थोरात यांनी शवविच्छेदन केले तरी शासनाने या शेतकऱ्यांला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

विजय चिडे ( ) छत्रपती संभाजीनगर