शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार व शिवसेना संपर्कप्रमुख बबनरावजी थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आज रामेश्वर तालुका औंढा नागनाथ येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या वतीने शेतकऱ्यांच्या विजेचे प्रश्न ज्यामधे जिल्ह्यातील शेतकरी वर्गा कडून होत असलेली सक्तीची विज वसुली थांबली पाहिजे शेतकऱ्यांना विज पुरवठा नियमितपणे देण्यात यावा या मागणीसाठी शिवसेनेचे वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते.यावेळी उपस्थित सहशिवसेना संपर्कप्रमुख सुनील काळे ,शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश भाऊ देशमुख, शिवसेना तालुकाप्रमुख माऊली झटे

यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश भाऊ देशमुख यांनी मार्गदर्शन केलं ह्या वेळी भाषांना दरम्यान जिल्हाप्रमुख महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना येत्या आठ दिवसांत जर शेतकऱ्यांच्या विजेचे प्रश्न नाही मिटलेतर गाठ शिवसेनेशी.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश भाऊ देशमुख यांच्या सह सहसंपर्कप्रमुख सुनील भाऊ काळे, उपजिल्हाप्रमुख अनिल कदम, जे डी मुळें, तालुका प्रमुख माऊली झटे, तालुका प्रमुख गणेश देशमुख, संघटक मुसळे, बबनराव इघारे माऊली मगर, तुकाराम गायकवाड, चंद्रकांत मगर , शिवसैनिक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते