रत्नागिरी,( वा.) मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे येथे राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या (NCC) वतीने 26/11 च्या हल्यात शहिद झालेल्या सर्व वीरांना सलामी देऊन मानवंदना देण्यात आली. 

NCC ऑफिसर श्री गणेश कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चाफे महाविद्यालयाच्या NCC विभागाच्या कॅडेट्सनी आज 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या भ्याड हल्यात शहिद झालेल्या सर्व महान विराना मानवानंदना देण्यात आली. हा दिवस शहिद दिन म्हणून ही साजरा करण्यात आला. 

 या मानवानंदने प्रसंगी प्रा. गणेश कुलकर्णी यांनी या दिवसाचे महत्व स्पष्ट केले. वीरांकडून आपण देशासाठी स्वतःचे प्राणही प्रसंगी पणाला लावले पाहिजेत, हे शिकणे आवश्यक असल्याचे सांगितले.

 यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य सौ.स्नेहा पालये ,संचालक सुरेंद्र माचिवले उपस्थित होते.