जैथरा: लग्न झाल्यावर प्रत्येक जोडप्यासाठी पहिली रात्र स्पेशल असते. त्यामुळे लग्न झाल्यावर बाहेर पर्यटनाच्या ठिकाणी हनिमून प्लॅनिंग करतात. मात्र एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. हनिमूनच्या पहिल्या रात्री पतीसोबत अस काही घडलं आहे की तो शॉकच झाला. स्वत: पतीनेही असा विचार केला नव्हता की त्याच्यासोबत अस काही घडणार असेल. 

नेमक काय घडल?

उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील जैथरा इथल हे प्रकरण आहे. 3 मेला लग्न झालेलं असत. लग्न होण्याआधी मुलीच्या घरच्यांनी मुलाला अंधारात ठेवत मोठी गोष्ट लवपत हा विवाह सोहळा ठरवला होता. ठरल्याप्रमाणे लग्न होत आणि दुसऱ्या दिवशी मुलगी निरोप घेऊन आनंदाने वधूसोबत घरी नांदायलाही आली.

प्रथेप्रमाणे सर्वांसारखी यांचीही पहिली रात्र असते. मात्र पतीचा पहिल्याच दिवशी हिरमोड होतो. कारण त्याची पत्नी त्याला पहिल्या दिवशी शारीरिक संबंध ठेवायला नकार देते. तो तरीही नाराज न होत समजून घेतो मात्र दुसऱ्या दिवशी खरी कहानी समोर येते. दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा पत्नीसोबत संबंध ठेवण्यासाठी तिला विचारतो तेव्हा पत्नी त्याला आपण किन्नर असल्याच सांगते.

दोन दिवसांपूर्वी वाजत गाजत लग्न करुन आणलेली बायको जेव्हा अस बोलते तेव्हा हे एकूण पतीला मोठा धक्का बसतो. असा आरोप आहे की, पाच दिवसांनी आरोपी पत्नी, सासू, वहिनी, सासरे आले आणि दागिने, पैसे घेऊन पळून गेले. पोलिसांनी तक्रारीवरुन गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.