औरंगाबाद: जिल्हा परिषद अंतर्गत गट क वर्गाची नोकर भरती करण्यास राज्य सरकारने वाहन चालक आणि गट ड वर्गातील पदे वगळून इतर पदे भरण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. एकूण रिक्त जागांच्या 80 टक्के जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

गट क वर्गासाठी होणारी ही पदभरती जिल्हा निवड मंडळ आणि जिल्हा परिषद अंतर्गत होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात 75 हजार नोकर भरती करण्यात येत असून यात ग्रामविकास विभागाची ही नोकर भरती महत्त्वाची मानली जाते.

ज्या विभागांचा किंवा कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध अंतिम झालेला आहे, अशा विभागातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे 100 टक्के भरण्यास मुभा देण्यात यत आहे. ज्या विभागांचा सुधारित आकृतीबंध अद्याप अंतिम झालेला नाही, अशा विभागातील गट अ, गट ब व गट क मधील (वाहनचालक आणि गट ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरम्यास मुभा देण्यात येत आहे.

कोणत्या खात्यांमध्ये किती भरती होऊ शकते....

आरोग्य खाते - 10 हजार 568

गृह खाते - 14 हजार 956

ग्रामविकास खाते - 11,000

कृषी खाते - 2500

सार्वजनिक बांधकाम खाते - 8,337

नगरविकास खाते - 1500

जलसंपदा खाते - 8227

जलसंधारण खाते - 2,423

पशुसंवर्धन खाते - 1,047

एकूण किती जागा रिक्त?

गृहविभाग- 49 हजार 851

सार्वजनिक आरोग्य विभाग : 23 हजार 822

जलसंपदा विभाग : 21 हजार 489

महसूल आणि वन विभाग : 13 हजार 557

वैद्यकीय शिक्षण विभाग : 13 हजार 432

सार्वजनिक बांधकाम विभाग : 8 हजार 12

आदिवासी विभाग : 6 हजार 907

सामाजिक न्याय विभाग : 3 हजार 821