कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील उचगाव येथून सहलीसाठी रत्नागिरीत आलेल्या १०० मुलांच्या ग्रुपमधील तेरा वर्षीय मुलगा आरे-वारे समुद्रात बुडाला. स्थानिकांच्या मदतीने त्याला वेळीच बाहेर काढण्यात आले. प्रकृती खालावल्याने त्याला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार करून कोल्हापूरला हलविले आहे. बुधवारी दुपारी दीड वाजता ही घटना घडली.याबाबत मिळालेली माहिती अशी. कोल्हापूर उजगाव येथील एका शाळेची सहल रत्नागिरीत आली होती. शिक्षक १०० मुलांना घेऊन रत्नागिरीत आले होते. सर्वजण दुपारी एकच्या सुमारास आरे वारे समुद्रकिनारी पोचले. तेथे गेल्यानंतर मुले मौज मजा करण्यासाठी समुद्रात उतरली होती. बराच वेळ मजा मस्ती सुरू असताना अचानक आदित्य अरुण मंचावकर (वय 13) हा मुलगा पाण्याच्या प्रवाहाबरोबर समुद्रात ओढला जाऊ लागला. हे लक्षात येताच सोबत असलेल्या मुलासह शिक्षकांनी ओरडा केला. तो ऐकून स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी धावले. त्यातील काही ग्रामस्थांनी समुद्र जाऊन आदित्यला बाहेर काढले. त्यानंतर आदित्यला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो मूळचा कोल्हापूर येथे असल्याने रात्री उशिरा त्याला कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्थानकाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
गुनौर ब्लॉक में मंडलम एवं सेक्टर अध्यक्षों की बैठक हुई संपन्न
गुनौर मंडलम एवं सेक्टर अध्यक्षों की बैठक हुई संपन्न
गुनौर ब्लॉक कांग्रेस अध्यक्ष...
15 अप्रैल को अवसानपुर (बरवइया) में होगी माॅं काली की प्रतिमा की प्राण प्रतिष्ठा, ग्रामीणों ने की पुष्प वर्षा की तैयारी
लखनऊ। उत्तर प्रदेश के अंबेडकर नगर जिले के अवसानपुर (बरवइया) में माँ काली की प्रतिमा की प्राण...
Chirag Paswan EXCLUSIVE: Bihar में विधानसभा चुनाव को लेकर जानिए चिराग पासवान की पार्टी की तैयारी
Chirag Paswan EXCLUSIVE: Bihar में विधानसभा चुनाव को लेकर जानिए चिराग पासवान की पार्टी की तैयारी
भारतीय क्रांति सेना किस तरफ से अन्नत्याग उपोषण.
भारतीय क्रांति सेना किस तरफ से अन्नत्याग उपोषण.
शेतकरी रामदास पाटील यांनी ऊस कारखान्यास जात नसल्याने स्वतःला पेटून घेण्याचा केला प्रयत्न
शेतकरी रामदास पाटील यांनी ऊस कारखान्यास् जात नसल्याने स्वतःला पेटून घेण्याचा केला प्रयत्न