औरंगाबाद : उद्धव ठाकरेंनी अडीच तासांच्या औरंगाबाद दौऱ्यात अवघी 24 मिनिटे पाहणी केली. आता महाराष्ट्रातील नुकसानीची पाहणी 24 मिनिटांमध्ये हाईल का? असा सवाल कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित केला. तसेच आदित्य ठाकरेंनी त्यांच्या वडीलांना बाण, बांध यावर विचारणा करावी? असा सल्लाही सत्तारांनी दिला.ज्यांना बांध समजत नाही ते बांधाबद्द्ल काय बोलणार? ठाकरेंना स्वत:चा बाण सांभाळता आला नाही ते बांध काय सांभाळतील असा खोचक टोला देखील अब्दुल सत्तारांनी अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरेंना लगावला. पुढे सत्तार म्हणाले, घरामध्ये बसून चॉकलेट खाणे किंवा संगणकावर बसणे वेगळे असते, तर शेताच्या बांधावर पाहणी करणे वेगळे आहे. ठाकरेंनी औरंगाबाद जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. आता आदित्य ठाकरेही, पाहणी दौरा करत शेतकऱ्यांचे म्हणणं ऐकून घेत आहेत. यावेळी त्यांनी कृषीमंत्री सत्तार यांच्यावर टीका केली. आता यावरून दोन्ही गटातील नेते आमने- सामने आल्याचे चित्र आहे.2020 च्या खरीप हंगामातील पीक विम्याची उर्वरित रक्कम 331 कोटी तसेच 2021 चे 388 कोटी विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, सप्टेंबर महिन्यातील नुकसानभरपाई अनुदान 248 कोटी व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आमदार कैलास पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले. यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या गटातील नेते आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये मोठा वाद निर्माण होताना दिसत आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Kerala: 13 साल की भारतीय लड़की का कमाल, अफ्रीका की सबसे ऊंची चोटी Mount Kilimanjaro को किया फतह
Anna Mary conquered Mount Kilimanjaro: केरल की एक 13 साल की लड़की ने अफ्रीका की सबसे ऊंची...
पीसीसी मेंबर जीवन लाल सिद्धार्थ ने की पूर्व जनपद सदस्य से मुलाकात
पीसीसी मेंबर जीवनलाल सिद्धार्थ ने की पूर्व जनपद सदस्य मंगल सिंह राजावत से मुलाकात
मध्य...
Apollo launches India’s most advanced network for pediatric care with Apollo Children’s
professionals and cutting-edge facilities to provide world-class care to our young patients....
पीएम मोदी की राज्यपालों से अपील- केंद्र और राज्य सरकार के बीच बने प्रभावशाली माध्यम
राज्यपाल सम्मेलन के दौरान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने सभी राज्यपालों के आग्रह किया कि वे सभी...