रत्नागिरी : त्रिरत्न बौद्ध महासंघ केंद्राच्या वतीने पटवर्धन हायस्कूल येथे दिनांक 22/10/22 ते 24/10/22 या कालावधीत धम्मशिबिर संपन्न झाले. या शिबिराचे नेतृत्व धम्मचारी शीलरश्मी यांनी केले. याचबरोबर धम्मचारी सत्यरत्न, चंद्रनाथ व सत्यसागर व धम्मचारीणी क्षांतीश्री,गुणराशी यांनी देखील विविध कार्यक्रमात भाग घेतला.

धम्मदायाद सुत्त म्हणजेच धम्माचे वारसदार बनण्यासाठी काय केले पाहीजे, यावर सुंदर 4 प्रवचने झाली. सदर शिबिराला रत्नागिरी, लांजा ,सैतवडे ,जाकादेवी अशा विविध गावांमधून ७० बंधूं भगिनींनी सहभाग नोंदविला होता. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी धम्ममित्र जगदिश जाधव महेंद्र सावंत, संतोष गमरे आनंदा कांबळे, भिमदास जाधव शरद जाधव आदींनी विशेष प्रयत्न केले. 

या शिबीरासाठी वस्तू रुपाने, आर्थिक व श्रमदानाचे स्वरुपात ज्यांनी मदत केली त्या सर्वांचेच त्रिरत्न बौद्ध महासंघ रत्नागिरी केंद्रतर्फे आभार व्यक्त करण्यात आले.