राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा ही मागणी घेत माकप उतरलं रस्तावर

15 दिवसांत आलो दुष्काळ जाहीर करा नाहीतर तर महाराष्ट्र बंद करू 

माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या राज्य सरकारला इशारा

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान केले, आधीच कर्जबाजारी आणि बेरोजगारी ने त्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांना या नैसर्गिक संकटालाही तोंड देताना नाकीनऊ येत आहे.शेतकऱ्यांना कर्जमाफी घोषणा करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही त्यांना राज्य सरकार आर्थिक मदत आणि विमा मिळवून देण्यासाठी असमर्थ ठरली आहे.तातडीने राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मदत करावे.

ही प्रमुख मागणी घेऊन सोलापूरातील जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यासह कामगारांनी आंदोलन केले आहे.