गेल्या अनेक दिवसांपासून सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले. हे पाणी जमिनीत मुरल्याने जमिनीतील पाणी पातळीत वाढ झाल्याने कासारी (ता.शिरूर) येथील माळवाडीतील रविंद्र मारूती भुजबळ व विजय मारूती भुजबळ यांच्या बोअरवेलमधुन आपोआप पाणी बाहेर येत आहे. बोअरवेल मधुन आपोआप पाणी बाहेर येण्याची हि पहिलीच वेळ असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.