कन्नड : मराठवाड्यात झालेल्या नुकसानीची पाहणीसाठी आलेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची एकीकडे चर्चा सुरु असतानाच , दुसरीकडे त्याचवेळी एका शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे . कन्नड तालुक्यातील नादरपूर शिवारात रविवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली . पंडित एकनाथ निकम ( वय 47 ) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे . सतत पडत असलेल्या पावसाने पिके मातीमोल झाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या पंडित यांनी लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळलेउद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावरून काल दिवसभर राजकीय नेत्यांकडून आरोप - प्रत्यारोप सुरु होते . याचवेळी कन्नड तालुक्यातील नादरपूर येथील पंडित निकम या शेतकऱ्याने आत्महत्या केली . पंडित निकम यांची नादरपूर शिवारात गट नंबर 121 मध्ये शेती आहे . शेतात उधारीवर बियाणे आणून मका आणि कापूस पिकाची लागवड केली होती . जून - जुलै महिन्यात पाऊस चांगला झाल्याने पिके जोमात होती . कापसाला चांगला भाव मिळेल व कर्ज आणि उधारी फिटेल या आशेवर पंडित निकम यांनी जोमाने पिकांची मशागत व मेहनत केली . मात्र शेवटी परतीच्या अतिपावसाने पिकांना मोठा फटका बसला . कापूस पाण्याखाली तर मकाला कोंब फुटलेराज्यातील शेतकरी आज संकटात सापडला असताना सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून फक्त दौऱ्यावर दौरे केले जात आहे . कृषीमंत्री यांनी आत्तापर्यंत 70 तालुक्यातील गावातील पाहणी केली आहे . मात्र असे असताना देखील शेतकऱ्यांना अजूनही नुकसानभरपाईची मदत मिळालेली नाही . त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
BIS Bengaluru Hosts Sangam - 78th Independence Day, Tiranga Mela at Rangoli Gardens
BIS Bengaluru Hosts Sangam - 78th Independence Day, Tiranga Mela at Rangoli Gardens
Bengaluru;...
মোহন গাঁও আদৰ্শ অংগনবাড়ী কেন্দ্ৰ উদ্বোধন কৰিলে বিধায়ক ধৰ্মেশ্বৰ কোঁৱৰে
মোহন গাঁও আদৰ্শ অংগনবাড়ী কেন্দ্ৰ উদ্বোধন কৰিলে বিধায়ক ধৰ্মেশ্বৰ কোঁৱৰে। সোণাৰি সমষ্টিত নিৰ্মাণ...
सगळं ठरवून केलं गेलं, Eknath Shinde असेच मुख्यमंत्री नाही बनले! |Reason behind Bjp made Shinde CM
सगळं ठरवून केलं गेलं, Eknath Shinde असेच मुख्यमंत्री नाही बनले! |Reason behind Bjp made Shinde CM
Airtel के लिए बड़ी खुशखबरी, इस राज्य में 59 लाख 5G कस्टमर्स का आंकड़ा हुआ पार
एयरटेल भारत के टॉप टेलीकॉम ऑपरेटर्स में से गिना जाता है जिसके भारत में हजारों यूजर्स है। आपको बता...