ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या - जगदीश पाटील गव्हाणे औरंगाबाद जिल्ह्यासह - कन्नड तालुक्यात मागील चार- पाच दिवसांपासुन परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे.तसेच या पावसामुळे पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. विशेषतः काढणीस आलेल्या सोयाबीनचे कापुस मका या पिकाचे जिल्ह्यांसह तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या नुकसानीची दखल घेऊन शासनाने नुकसान भरपाई जाहीर करण्याची मागणी दुर्गा ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष जगदीश पाटील गव्हाणे यांनी केली आहे.