औरंगाबाद : तंत्रज्ञानाचा वापर करत शासकीय योजनांचा लाभ सामान्यांना मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल . तसेच पैठणी , हिमरू शाल , बिद्री कलेच्या वस्तूंना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठीही आपण प्रयत्न करू , असे आश्वासन नूतन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारल्यानंतर दिले . पत्रकारांशी बोलताना पांडेय म्हणाले , शेतकरी सन्मान निधी , पीक विमा आदी योजनांची प्रभावी अंमलबजावणी , पावसाने नुकसानीची भरपाई मिळवून देण्यास प्राधान्य असेल . शेतकरी आत्महत्या रोखण्याबरोबरच पर्यटन विकासासाठीही आपण प्रयत्नशील राहू . यापूर्वी मी मनपात असताना पाणीपुरवठा योजनेवर काम केले आहे . आता विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचे काम सुरू आहे . जिल्हाधिकारी म्हणून मीही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी मदत करणार आहे . मेट्रो , सातारा देवळाई ड्रेनेजची कामही पूर्ण करण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे . स्मार्ट सिटीअंतर्गत कामे , खाम व सुखना नदीचे पुनरुज्जीवन , पैठणच्या उद्यानाचा विकास या कामावर आपला भर असल्याचे पांडेय म्हणाले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
शो में उठा पॉपुलैरिटी को लेकर सवाल, लगाए गए एक-दूसरे पर गंभीर आरोप
बिग बॉस 16 (Bigg Boss 16) जब से शुरू हुआ है तभी से लगातार खबरों में बना हुआ है. हर रोज शो में एक...
Ujjwala Yojana पर बोले केंद्रीय मंत्री Anurag Thakur, कहा- उज्जवला पर सरकार ने बढ़ाई सब्सिडी
Ujjwala Yojana पर बोले केंद्रीय मंत्री Anurag Thakur, कहा- उज्जवला पर सरकार ने बढ़ाई सब्सिडी
128GB स्टोरेज, 64MP AI कैमरा और 5000 mAh बैटरी वाले फोन की कीमत हुई बेहद कम, जानिए नया दाम और ऑफर्स
64MP AI कैमरा वाले Realme Narzo N55 स्मार्टफोन पर अच्छा डिस्काउंट मिल रहा है। लॉन्च के समय इसकी...
ડીસામાં બે અલગ-અલગ જગ્યાએ અકસ્માત સર્જાયા
ડીસામાં બે અલગ અલગ જગ્યાએ રિક્ષાનો અકસ્માત સર્જાયો હોવાની ઘટના સામે આવી છે. જેમાં ભોંયણ ગામ...