औरंगाबाद : तंत्रज्ञानाचा वापर करत शासकीय योजनांचा लाभ सामान्यांना मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल . तसेच पैठणी , हिमरू शाल , बिद्री कलेच्या वस्तूंना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठीही आपण प्रयत्न करू , असे आश्वासन नूतन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारल्यानंतर दिले . पत्रकारांशी बोलताना पांडेय म्हणाले , शेतकरी सन्मान निधी , पीक विमा आदी योजनांची प्रभावी अंमलबजावणी , पावसाने नुकसानीची भरपाई मिळवून देण्यास प्राधान्य असेल . शेतकरी आत्महत्या रोखण्याबरोबरच पर्यटन विकासासाठीही आपण प्रयत्नशील राहू . यापूर्वी मी मनपात असताना पाणीपुरवठा योजनेवर काम केले आहे . आता विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचे काम सुरू आहे . जिल्हाधिकारी म्हणून मीही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी मदत करणार आहे . मेट्रो , सातारा देवळाई ड्रेनेजची कामही पूर्ण करण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे . स्मार्ट सिटीअंतर्गत कामे , खाम व सुखना नदीचे पुनरुज्जीवन , पैठणच्या उद्यानाचा विकास या कामावर आपला भर असल्याचे पांडेय म्हणाले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
औरंगाबाद | पतिने पत्नीचा डोक्यात लोखंडी फावडा मारून केला खुन
औरंगाबाद | पतिने पत्नीचा डोक्यात लोखंडी फावडा मारून केला खुन
Parliament Winter Session LIVE Updates: आज से संसद का शीतकालीन सत्र, संसद भवन से क्या बोले PM मोदी?
Parliament Winter Session LIVE Updates: आज से संसद का शीतकालीन सत्र, संसद भवन से क्या बोले PM मोदी?
ಕರ್ನಾಟಕ ಏಜುಕೇಶನ್ ಸರ್ವಿಸ್ ಸಂಸ್ಥೆಯಿಂದ ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಕೆರಿಯರ್ ಅಭಿಯಾನಕ್ಕೆ ಚಾಲನೆ
ಕರ್ನಾಟಕ ಏಜುಕೇಶನ್ ಸರ್ವಿಸ್ ಸಂಸ್ಥೆಯಿಂದ ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಕೆರಿಯರ್ ಅಭಿಯಾನಕ್ಕೆ ಚಾಲನೆ