लोणार दिनांक 12 ऑक्टोंबर 2022

हायकोर्टाच्या टिके नंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी जाहीर केले आहे की पत्रकारांशी असभ्य वर्तन करणाऱ्यांना 50 हजार रुपयाचा दंड आणि पत्रकाराची गैरवर्तन करणाऱ्याला तीन वर्षाच्या तुरुंगवास  होऊ शकतो.

पत्रकाराला जर कोणी धमकी दिली तर धमकी देणाऱ्याला कारावास होऊ शकतो 24 तास दिले जातील पत्रकारांना धमकवल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांना, सहजा सहजी जमीन मिळणार नाही. सी एम योगी म्हणाले,  पत्रकारांशी आदराने बोला नाहीतर मोजावी लागणार किंमत गैरवर्तन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर एफ आय आर नोंदवला जाईल अन्यथा एस एस पी वर कार्यवाही केली जाईल.

पत्रकार जमावाचा भाग नाहीत हीच बाब लक्षात घेऊन प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्केट काटजू यांनी राज्य सरकारांना ताकीद दिली असून पत्रकाराची गैर वर्तणूक करू नये अशा सूचना दिल्या आहेत. कोणत्याही ठिकाणी हाणामारी किंवा गदारोळ  झाल्यास पोलीस पत्रकाराच्या कामात हस्तक्षेप करू शकत नाहीत.

पोलीस पत्रकारांना जशी गर्दी हटवतात तशीच पत्रकार त्याचे काम सार्वजनिक ठिकाणी करतात पण ते गर्दीचा भाग नसतात त्यामुळे पत्रकारणात त्यांच्या कामापासून रोखणे हे माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे, या संदर्भात प्रेस कौन्सिलने देशाचे कॅबिनेट सचिव, गृहसचिव, मुख्यमंत्री ,मुख्य सचिव आणि सर्व राज्यांच्या गृहसचिवांना सूचना पाठवल्या असून पत्रकारांसोबत पोलीस किंवा निमलष्करी दलाकडून होणार हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे पत्रकारावर असे कोणतेही कृत्य होणार नाही याची काळजी  सरकारने घ्यावी पत्रकारांसोबत केलेला हिंसाचार हा प्रसार माध्यमाच्या स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन मानला जाईल जो घटनेच्या कलम 19ए मध्ये देण्यात आला आहे आणि घटनेच्या या कलमानुसार गर्वर्तन करणाऱ्या पोलीस किंवा अधिकार्‍यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल