बीड (प्रतिनिधी):- "शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना.. ठाकरे सोडून शिवसेना नाही. आम्ही सदैव माननीय उद्धव साहेब ठाकरे व मनानिय आदित्य साहेब ठाकरे यांच्या सोबत" असल्याचे सांगत गेल्या १९ दिवसांपासून बीड ते शिवतीर्थ (मुंबई) पर्यंत निष्ठायात्रा शिवसेनेचे माजी बीड तालुकाप्रमुख उल्हास गिराम यांनी पायी चालत सुरू केली असून आज ही यात्रा नवी मुंबईपर्यंत पोहोचली आहे.

काल दिनांक ०३ ऑक्टोबर २०२२ रोजी या यात्रेस १९ दिवस पूर्ण झालेले असून सलग १९ दिवसांपासून पायी चालत शिवसैनिक आपली निष्ठा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रती व्यक्त करत आहेत. शिवसेनेतील बंडाच्या अनुषंगाने ही निष्ठा यात्रा खूप महत्वाची ठरत असून निष्ठावंत शिवसैनिक 450 किलोमिटर पायी चालत स्वार्थासाठी बंड केलेल्यांना नैतिकदृष्ट्या चांगलेच उत्तर देत आहेत. या यात्रेस गेल्या काही दिवसांमध्ये विविध ठिकाणी शिवसेनेच्या नेत्यांनी भेटी दिल्या असून शिवसैनिकांचे मनोधैर्य वाढवले आहे. हि निष्ठा यात्रा मुंबई येथील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात सहभागी होणार आहे.