औरंगाबाद : सातारा परिसरातील पोलिस ठाण्याच्या मागील सह्याद्रीनगर , अर्थनगरात ड्रेनेजलाइनचे योग्य प्रकारे नियोजन केले नसल्याने वसाहतींत पाणी शिरत आहे . त्यामुळे नागरिक जुलाब , मळमळ व पोटाच्या विकाराने त्रस्त आहेत . परिसरात घाण पाण्याचे तळे साचल्याने श्रावणलाल मोदी शाळेतील ३०० विद्यार्थ्यांनाही दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे . तसेच शाळेत मोकाट कुत्रे शिरतात . त्यामुळे शाळेच्या गेटवर एका शिक्षकाला पहारा द्यावा लागतो . मनपा प्रशासनाला निवेदन देऊनही प्रकरण गांभीर्याने घेत नसल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे . सह्याद्रीनगर , अर्थनगरात उंचीवरील वसाहती व इतर भागातील ड्रेनेजचे पाणी शिरते . पावसामुळे अनेकांच्या घरांसमोर घाण पाणी साचते . त्यामुळे मच्छरांचाही उपद्रव वाढतो . मनपाने मुख्य ड्रेनेजलाइन तयार करून त्यात कनेक्शन जोडल्यास ही समस्या सुटू शकते . मात्र , याकडे मनपा दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
INGKA CENTRES’ NEWEST DESTINATION, “LYKLI” PUTS INDIA IN FRONT AND CENTRE OF THE RETAIL REVOLUTION
India's retail landscape is experiencing a remarkable transformation as the country witnesses a...
Sehat Talk with Isha Bhatia Sanan, Ep. 09: Understanding Hormones
Sehat Talk with Isha Bhatia Sanan, Ep. 09: Understanding Hormones
ડાંગેશ્વર મહાદેવનું મંદિરનું અનેરું મહત્વ
#buletinindia #gujarat #banaskantha