औरंगाबाद : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी समजाला समता व बंधुत्त्वाची अनमोल शिकवण दिली आहे . आज प्रत्येकांनी ती शिकवण आत्मसात करणे नितांत गरजेचे आहे . असे प्रतिपादन जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय कांकरीया यांनी केले . जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने रविवारी गांधी भवन येथील महात्मा गांधी पुतळ्यास आणि माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी पुढे बोलताना कांकरीया म्हणाले की , स्वच्छता अंतर्गत व बाह्य असायला हवी . अंतरमनाची स्वच्छता , मानवता , बंधुता जोपासणे , प्रत्यक्ष कृतीत उतरायला हवी . राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी समता , बंधुता बरोबरच अहिंसेची अनमोल शिकवण दिली आहे