रत्नागिरी : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या शासनमान्य आर्थिक मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्याने जिल्ह्यातील कर्मचारी वर्ग आता आक्रमक झालेले आहेत. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतील कर्मचारी विविध मागण्यांसाठी दि. ३ ऑक्टोबर २०२२ रोजी जि.प. कार्यालायासमोर धरणे-निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.
जिल्हा स्तरावरील काही शासनस्तरावरुन मंजुर झालेल्या मागण्यांची अंमलबजावणी होत नाही. यामध्ये सुधारित किमान वेतन दर लागू करणे, राहणीमान भत्याची आदाई करने, भविष्यनिर्वाह निधीचे खाते अद्यावत करणे तसेच काही ठिकाणी सेवा पुस्तिका सुध्दा अद्यावत नोंदीने परिपूर्ण करण्यात आलेल्या नाहीत. या सर्व सेवा पुस्तके अद्यावत करणेबाबतची कार्यवाही करणे. तसेच शासनाकडील निर्देशानुसार संघटनांचे प्रतिनिधी समवेत स्वतंत्र समन्वय बैठकीचे आयोजन करणे या सर्व बाबीसंदर्भात आपल्या स्तरावर योग्य पध्दतीने अंमलबजावणी होत नसल्याने व स्थानिक पातळीवरील प्रश्न तातडीने सुटण्याच्या उद्देशाने सोमवार दिनांक ०३ ऑक्टोबर २०१२ रोजी रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ या संघटनेच्या वतीने धरणे-निदर्शने आंदोलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.