औरंगाबाद: करमाड ते औरंगाबाददरम्यान वरूड फाट्याजवळ १८ सप्टेंबर रोजी स्मार्ट सिटी बस जळाली होती . या बसची बुधवारी टाटा कंपनीच्या पथकाने तपासणी केली . हे पथक दिल्ली येथील टाटा मोटार्सच्या मुख्यालयातील व्यवस्थापकीय संचालकांना अहवाल पाठवणार आहे . त्यानंतर हा अहवाल स्मार्ट सिटीच्या सीईओंना मिळेल . त्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल . स्मार्ट सिटी बसला आग लागल्यानंतर प्रसंगावधान राखून चालकाने बस थांबवून प्रवाशांना खाली उतरवले . बसला तांत्रिक कारणामुळे आग लागली असून टाटा कंपनीचे पथक तपासणी करेल , असे स्मार्ट सिटीचे व्यवस्थापक राम पवनीकर यांनी सांगितले होते . त्यानंतर टाटा कंपनीच्या चार जणांचे पथक बुधवारी येऊन पाहणी करून गेले . या पथकात धारवाड येथील टाटा कंपनीचे बॉडी बिल्डिंग विभागाचे अभियंता , पुणे येथील टाटा प्लँटचे दोन अधिकारी आणि आरएनडी विभागाचे एक अधिकारी होते . पथकाने बसची पाहणी केल्यानंतर स्थानिक अधिकारी व टाटा सर्व्हिस सेंटरमधील मेकॅनिककडून माहिती घेतली
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Samsung Galaxy A15 vs Vivo T2 Pro 5G : कैमरा से लेकर बैटरी तक जानिए कौन सा फोन है बेहतर
हाल ही में सैमसंग ने अपना बजट फ्रेंडली फोन यानी Samsung Galaxy A15 को लॉन्च किया है। इस फोन में...
'इनका बलिदान हमें राष्ट्र सेवा के लिए प्रेरित करता है...' महात्मा गांधी की 76वीं पुण्यतिथि पर पीएम मोदी ने दी श्रद्धांजलि
नई दिल्ली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने मंगलवार को महात्मा गांधी की 76वीं पुण्यतिथि पर...