कन्नड तालुक्यातील किल्ले अंतुर वरती होणारे गैर कृत्यांना आळा घालण्याची मागणी सह्याद्री प्रतिष्ठान कन्नड विभाग या दुर्ग संवर्धन संघटनेने केली आहे . या बाबद सहाय्यक संचालक राज्यपुरातत्व विभाग औरंगाबाद व पिशोर पोलीस ठाणे यांना दिलेल्या निवेदना नुसार किल्ले अंतुर वरती काही अनोळखी लोक मद्यपान , मांसाहार शिजविणे , पत्ते , जुगार खेळणे आदी मेजवान्या करीत असुन यामुळे किल्ल्याचे पावित्र्य धोक्यात आले आहे . तशा प्रकारचे फोटो व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल झाले आहेत तसेच शमेजवान्या साठी वापरल्या जात असलेल्या प्लास्टिक पत्रावळ्या ग्लास आदी वस्तु ही किल्ल्या वरतीच फेकून देत असल्या मुळे अस्वच्छता व प्रदुषण निर्माण होऊण पर्यावरणास हानी पोहचत आहे . या गैर प्रकारांना पायबंद घालण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आले प्रसंगी विष्णु भिंगारे , किशोर नागणे , संदिप नवले , अंकुश जाधव , मारुती बढे , संदिप शिंदे , कैलास मारकड , ईश्वर कोटावळे , ज्ञानेश्वर ओपळेकर , प्रशांत चौधरी , उपस्थित होते