कामावर रुजू करून घेत नसल्याने जांब राजापूर येथील ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचे औंढा पंचायत समिती समोर अमरण उपोषण सुरू

औंढा नागनाथ तालुक्यातील जांब राजापूर येथील ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी अशोक भालेराव हे 2011 पासून कार्यरत होते परंतु त्यानंतर ग्रामपंचायत ने त्यांना कामावरून कमी करण्यात आल्याने त्यांनी औद्योगिक न्यायालय जालना येथे तक्रार केली यात या औद्योगिक न्यायालयाने त्यांना कामावर घेण्याचे आदेश दिले आहेत तरीही ग्रामपंचायत कामावर घेत नसल्याने अशोक भालेराव यांनी 17 सप्टेंबर पासून औंढा पंचायत समिती समोर अमरण उपोषण सुरू केले आहे.दरम्यान जोपर्यंत सेवा नियमित करत नाहीत व सेवेचे संपूर्ण लाभ देत नाहीत तोपर्यंत हे आमरण उपोषण सोडणार नाही असा पवित्रा भालेराव यांनी घेतलेला आहे त्यामुळे आता प्रशासन यावर काय कारवाई करते हे पाहावे लागणार आहे.