औंरगाबाद : राज्यात सध्या लम्पी या आजाराने थैमान घातलं आहे. लम्पीमुळे जनावरांचा मुत्यू देखील होत आहे. त्यामुळे राज्य सरकार सतर्क झालं असून आता जनावरांसाठी क्वारंटाईन सेंटर उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. जनावरांच्या लम्पी स्कीन या आजारासंदर्भात टास्क फोर्सची स्थापनाही करण्यात आली आहे. जनावरांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लम्पीला रोखण्यासाठी जनावरांसाठी क्वारंटाईन सेंटर उभारण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना ही घोषणा केली. तसेच लम्पीमुळे मृत पावलेल्या जनावरांचा मोबदला त्या शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचं देखील म्हटलं आहे. लम्पी सध्या राज्यातील तब्बल 22 जिल्ह्यांमध्ये पसरला आहे.तर ज्या ठिकाणी लम्पीची लागण झाली त्या ठिकाणाहून पाच किमीच्या परिसरातील जनावरांचं लसीकरण करण्यात येत आहे. लम्पीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 10 सदस्यांच्या टास्क फोर्सची स्थापन करण्यात आलेली आहे. दरम्यान, लम्पी बाधित पशुधनाच्या औषधांचा सगळा खर्च सरकार करणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
 PLease Click Here to Join Now
 Search
 Categories
 - City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
  फलोदी सट्टा के अनुमान के बीच राजस्थान भाजपा के दिग्गज नेता का बड़ा दावा, बताया- जीतेंगे इतनी सीटें 
 
                      राजस्थान में लोकसभा चुनाव 2024 के छह चरणों के मतदान संपन्न होने के बाद सभी राजनीतिक दलों की ओर से...
                  
   हरियाणा विधानसभा चुनाव के लिए JJP-ASP का गठबंधन:दुष्यंत चौटाला का ऐलान; 70 पर जजपा, 20 पर आजाद समाज पार्टी उतारेगी उम्मीदवार 
 
                      हरियाणा में जननायक जनता पार्टी और आजाद समाज पार्टी विधानसभा चुनाव मिलकर लड़ेंगी। मंगलवार को दिल्ली...
                  
   ડીસા રાણપુર રોડ પર આજે વહેલી સવારે મજૂરો ભરીને બટાટામાં તોલમાં જઈ રહેલા લોકોને અકસ્માત નડ્યો હતો 
 
                      ડીસા રાણપુર રોડ પર આજે વહેલી સવારે મજૂરો ભરીને બટાટામાં તોલમાં જઈ રહેલા લોકોને અકસ્માત નડ્યો હતો
                  
   सामाजिक न्याय एवं अधिकारिता विभाग का कार्यालय पिछले 2 साल से बंद केशोरायपाटन  । 
 
                      सामाजिक न्याय एवं अधिकारिता विभाग का कार्यालय पिछले 2 साल से बंद केशोरायपाटन 
 पंचायत...
                  
   
  
  
  
  