बीड दि.९ (प्रतिनिधी) :- अनंत चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर गजानन सहकारी कारखान्यातील रोलर पूजनाचा कार्यक्रम शुक्रवार (दि.९) रोजी राजुरी (न.) येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांनी येणाऱ्या काळात आपल्या विधानसभा क्षेत्राततील शेतात एकही उसाचे टिपरू शिल्लक राहू देणार नाही जेणेकरून आपल्या भागातील शेती आणि शेतकरी कायम खुश राहील असा विश्वास दिला. 

तब्बल दहा वर्षांपासून बंद असलेला गजानन सहकारी साखर कारखाना येत्या गळीत हंगामात स्व.केशरकाकू व स्व. सोनाजीराव नाना क्षीरसागर यांच्या प्रेरणेने तसेच आ.संदीप क्षीरसागर यांच्या पुढाकारातून परिपूर्णरीत्या सुरु होणार आहे. याअनुषंगाने कारखान्यातील विविध यंत्रणांची दुरुस्ती तसेच स्थापना सुरु असून शुक्रवार (दि.९) रोजी अनंत चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर नवीन रोलरचे पूजन करण्यात आले. यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांच्यासह महंत अमृतदास महाराज जोशी, धाराशिव कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक अमर पाटील,चेअरमन रवींद्र दादा क्षीरसागर, अनंत आखाडे, हेमंत क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर, जेष्ठ नेते सुरेश पाटील, श्री.चौघुले, श्री.बोरगावकर, श्री. बहिर, श्री.लिंबकर, श्री.सावंत तसेच डी.व्ही.पी. कमोडिटी प्रा.लि. संचलित गजानन सहकारी साखर कारखान्याचे सर्व अधिकारी-कर्मचारी, सरपंच, उपसरपंच व परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.