वैभव क्षीरसागर यांना मातृशोक बीड- बीड शहर व पंचक्रोशीत परिचित असलेले उद्योजक वैभव क्षीरसागर यांच्या मातोश्री सौ वनमाला सुरेश क्षीरसागर यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे शनिवारी निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय 73 वर्ष होते.त्यांच्या पार्थिव देहावर रविवारी सकाळी दहा वाजता नवगण राजुरी येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. क्षीरसागर घरातील प्रेमळ स्वभावाच्या,सर्वांशी हसतमुखाने वागणाऱ्या बोलणाऱ्या म्हणून वनमाला काकू परिचित होत्या.सुरेश क्षीरसागर यांच्याशी विवाह झाल्यानंतर संपूर्ण क्षीरसागर कुटुंबाची जबाबदारी त्यांनी पेलली होती. बीड शहरातच नव्हे तर समाजात त्या सुपरिचित होत्या.गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती बिघडल्याने पुणे येथे रुग्णालयात उपचार सुरू होते.शनिवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात 4 मुली,2 मुले,सुना ,जावई,नातवंडे असा परिवार आहे.नवगण राजुरी येथील शेतात रविवारी अंत्यसंस्कार होतील.