परभणी(प्रतिनिधी)पुर्णा तालुक्यातील वझुर शिवारात आकाश माधव टाले (वय 22 ) या युवकाने लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या पश्चात आई, वडील, एक मोठा भाऊ, भावजई असा परिवार आहे . रागाच्या भरात येऊन त्याने आत्महत्या केली असे बीट जमादार त्र्यंबक शिंदे यांनी सांगितले. आई अंधाराचे शेतात जाऊ नको गेलास तर तिथेच झोप घरी येऊ नकोस असे म्हणत होती यावर आकाशला राग आला व रागाच्या भरात त्याने शेतात लिंबाच्या झाडावर चढून दोरीच्या साह्याने गळफास घेतला, असे पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलिसांत आकस्मित मृत्यू म्हणून नोंद झाली.