व्याड:- (नितीन थोरात) गेल्या काही महिन्या पासून व्याड येथील बौद्ध वाड्यात खांब वरील लाईट नसल्याने बौद्ध वाड्यात अंधाराचे सावट कायम आहे.सध्या शेतातील निदनी कुरपणी चे काम असून महिला भगिनी याना सकाळीच उठून विहीर मधील पाणी काढण्याचा त्रास होतो. काल व्याड येथील बौद्धवाड्यातील विहिरी मद्ये महिला चा तोल जाताना बचावली आहे.अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती.तरी ही ग्राम पंचायत या कडे दुर्लक्ष करत असून.लाईनमन हे लाईट लावण्यास मनाई करत आहे .तरी सदर प्रकरणात ग्राम पंचायत ने लक्ष देत त्वरित विहीर जवळीक लाईट बसवण्यात यावे अशी ग्रामस्थ ची मागणी आहे