यवतमाळ जिल्ह्यात सततचा पाऊस व अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिक पावसाने हिरावून घेतले आहे. संततधार पावसामुळे आणि पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी झाली असून संपूर्ण जिल्हा तात्काळ सरकारने ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने डफडे वाजवा, सरकार ला जगवा  आंदोलन केले.  दरम्यान सरकारने जिल्हा ओला दुष्काळ जाहीर न केल्यास वंचित तीव्र आंदोल करण्याचा इशारा दिला आहे.