इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशन शाखा जालना महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल ट्रस्ट शाखा जालना, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. मदनलाल सिताराम अग्रवाल, स्व. श्रीमती सावित्रीबाई कचरूलाल राठी, स्व. दत्तात्रय शामराव लोणीकर यांच्या स्मृत्यर्थ माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली 20 ऑगस्ट शनिवार रोजी परतुर येथील मंत्री बाल रुग्णालय येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मोफत कॅन्सर तपासणी शिबिर संपन्न झाले असून 75 गरजूंनी याचा लाभ घेतला. कर्करोगाचे निदान व कर्करोगास कारणीभूत जीवनशैली टाळण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय अध्यक्ष ललीत गांधी व महामंत्री संदिप भंडारी यांच्या नेतृत्वात ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशन शाखा जालनाच्या वतीने दि. 20 व 21 ऑगस्ट दरम्यान कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत परतुर येथे 20 ऑगस्ट रोजी शिबिर आयोजित करण्यात आले. ज्यात स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग, तोंडाचा कर्करोग आणि ब्राँकायटिस कर्करोगच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. तज्ञ डॉक्टरांची टीम विथऑल सेटअप व्हॅनद्वारे उपस्थित राहून मोफत तपासणी करण्यात आली.

यावेळी ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशन शाखा जालनाचे सचिव दिनेश बरलोटा, प्रकल्प प्रमुख संजय बंब, मनोज मुथा, डॉ. बी. आर. मंत्री, डॉ स्वप्नील बी. मंत्री, डॉ लता पुरी, डॉ सुप्रिया मंत्री, डॉ महेंद्र पाटील, निहित सकलेचा, डॉ अक्षय सकलेचा, सौरभ बगडीया, आश्विन दायमा, डॉ संदीप चव्हाण, गजानन कोरडे, दिपक पाटोळे, अर्जून भांडवलकर, तुकाराम पवार, माऊली, डॉ सुधीर आंबेकर, शञुघ्न कणसे, डॉ प्रफूल्ल गट्टाणी, डॉ कल्याण बोनगे, नेमीचंद कोटेचा, डॉ अशोक शेळके, डॉ सुरूशे, भगवान मोरे व नागरिक मोठ्या संख्येेने उपस्थित होते.

कॅन्सरप्रती जागरूकता निर्माण होणे गरजेचे- डॉ. स्वप्नील बी. मंत्री*

योग्य वेळी निदान झाल्यास प्राथमिक अवस्थेतील कर्करोगाचा उपचार होउ शकतो. नंतरचे उपचार अधिक खर्चिक आणि तुलनेनं कमी प्रभावी ठरतात, ही बाब विचारात घेऊन कॅन्सरच्या प्रारंभिक तपासणीची निशुल्क उपलब्ध करून देणे, कॅन्सरच्याप्रती जनतेला जागरूक करणे, यासाठी हे अभियान असल्याची माहिती मंत्री बाल रूग्णालयाचे संचालक डॉ. स्वप्नील बी. मंत्री यांनी सांगितले.

चौकट

*महाराष्ट्र कॅन्सरमुक्त करणे हा उद्देश- निहीत सकलेचा*

कॅन्सर हा शब्द उच्चारला तरी मनात धडकी भरते. मात्र, आरोग्य क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात क्रांती झालेली असून, कॅन्सर प्रमाणेच अनेक असाध्य रोगांवरही उपचार उपलब्ध आहेत. वेळीच निदान व उपचारानंतर कॅन्सरसुध्दा बरा होउ शकतो, हे लोकांपर्यंत पोहचविणे हा कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियानाचा उद्देश असल्याचे केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष निहीत सकलेचा म्हणाले.