माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त अमरावती जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘सद्‌भावना दिवस’ प्रतिज्ञा दिली.जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करण्याची तसेच सर्व प्रकारचे मतभेद हे हिंसाचाराचा अवलंब न करता संविधानिक मार्गानी सोडविण्याची प्रतिज्ञा जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना दिली.निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बीजवल, उपजिल्हाधिकारी व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मनिष गायकवाड, उपजिल्हाधिकारी राम लंके, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, नाझर किशोर चेडे, अमोल दांडगे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.