जिंतूर तालुक्यातील दगडचोप येथील दुर्गम भागातून पायपीट करत शाळेत जाणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना जिंतूर येथील युवा उद्योजक लक्ष्मीकांत टाले आणि सौ.सुरेखा टाले यांनी स्वखर्चाने सायकल भेट देऊन मदत केली आहे. जिंतूर चे माजी नगर अध्यक्ष प्रतापराव देशमुख यांच्या उपस्थितीत दगडचोप येथील वैजनाथ भगत व कृष्णा मगर या विद्यार्थ्यांना सायकली भेट देण्यात आल्या.यावेळी माजी नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख, संपादिका सौ.सुरेखा शेवाळे-टाले, युवा उद्योजक लक्ष्मीकांत टाले, पत्रकार सचिन रायपत्रीवार, महेश देशमुख, रत्नदीप शेजावळे, शेख अलीम, सरपंच परमेश्वर ढोणे, सुधाकर साबळे, अरुण भगस, भगवान मगर, सौ.सुवर्णा मगर, सौ.गोदावरी भगस,यांची उपस्थिती होती. या मदतीबद्दल पालकांकडून टाले दापत्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.