औरंगाबाद : (दीपक परेराव ) - स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या काळात केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ‘ हर घर तिरंगा ' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे . या उपक्रमाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाववी म्हणून विद्यालयाच्या वतीने शाळेच्या परिसरातील भागात जन जागृती रॅली काढण्यात आली.या रॅलीत विद्यार्थ्यांच्या हातात घोषवाक्याचे फलक देण्यात आले होते. "वंदे मातरम" "भारत माता की जय" घोषणेने विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून टाकला.विद्यार्थ्यांन मध्ये देश भक्ती अजून दृढ व्हावी या भावनेने हर घर तिरंगा या उपक्रमाचा संदेश घरोघरी पोहोचवण्यात आला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष भानुदास शिंगणे सर मुख्यध्यापक शंकर शिंगणे, प्राथमिक मुख्यध्यापिका शीतल येवले (शिंगणे), यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकवृंद,मंगल सरोसे,नितु राऊत,रंजना परेराव,मीनाक्षी शिंदे,मनीषा गायकवाड,प्रियांका शिंदे,कल्याणी गव्हाणे,अश्विनी लखमावाड,शैलजा कुलकर्णी मॅडम व सुरज येवले,सुमित डोईफोडे,शेख जफर,श्याम शेळके सर यांनी परिश्रम घेतलेया वेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.