आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत स.भु. बालानगरची भव्य रॅली.

बालानगर प्रतिनिधी;बालानगर ता.पैठण येथे बाजाराचे औचित्य साधून मोठ्या उत्साहाने श्री सरस्वती भुवन प्रशालेच्या विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आली.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त विद्यार्थ्यांनी गावात जनजागृती करण्यासाठी विविध स्वातंत्र्यसेनानी, समाज सुधारक यांच्या वेशभूषा करून "हर घर तिरंगा, हर मन तिरंगा" चा जयघोष करीत सर्वांना स्वातंत्र्याचे महत्व पटवून दिले. बाजारासाठी पंचक्रोशीतून आलेल्या नागरिकांनी विद्यार्थ्यांचा उत्साह, भव्य दिव्य रॅली पाहून विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. मा. मुख्याध्यापक श्री शिरीष मोरे यांच्या मार्गदर्शनात काढलेली ही जनजागृती रॅली यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे पर्यवेक्षक गायकवाड, क्रिडाशिक्षक राहूल शिंदे, फिरोज पटेल, प्रदीप ब्राह्मणकार , सीमा लखमण, सारिका तोड़कर, मच्छिंद्र पाटील, राजेभाऊ गायकवाड, नलिनी अमते, सुरेखा जैन, विलास कोळी, राहुल जाधव, संजय राऊत, वैशाली कुंभकरण तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी परीश्रम घेतले.

(छायाचित्रे-अफसर शेख,बालानगर)