तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे . या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तालुक्यात संवाद दौरा सुरु केला आहे . सहसंपर्क प्रमुख अॅड . आसाराम रोठे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सहा गावांत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेटी दिल्या . उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा दमदार वाटचाल करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना व जनतेला करण्यात आले . पानवी , माळीघोगरगाव , अव्वलगाव , हमरापूर , वांजरगाव , सावखेडगंगा येथील शिवसैनिक , कार्यकर्ते व शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला . माजी सभापती अविनाश गलांडे , तालुकाप्रमुख सचिन वाणी , संजय निकम , उपतालुकाप्रमुख रमेश सावंत आदी सहभागी झाले होते