रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव,घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात भगवान बिरसा मुंडा जयंती (जनजाती गौरव दिवस) आयक्यूएसी विभाग, समाजशास्ञ विभाग व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला.

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेसाठी स्वातंञ्य संग्रामातील जनजाती वीरांचे योगदान हा विषय देण्यात आला होता. स्पर्धेला विद्यार्थ्यानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मराठी विभागप्रमुख सौ. अनन्या धुंदूर यांनी वादविवाद स्पर्धेचे परिक्षण केले. वादविवाद स्पर्धेमध्ये यशराज चाळके याने प्रथम क्रमांक प्राप्त केला.

यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील, उपप्राचार्या सौ. वसुंधरा जाधव, कला शाखा प्रमुख सौ. ऋतुजा भोवड, इतिहास विभागप्रमुख सौ.रिया बंडबे , समाजशास्ञ विभागप्रमुख हरेश केळकर, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. तांत्रिक सहाय्य प्रा विनय कलमकर यांनी केले.