शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना तब्बल 100 दिवसांनी पत्राचाळ प्रकरणात विशेष पीएमएलए न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामिन मिळाल्याचे जाहीर होताच धर्माबाद च्या पानसरे चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने एकमेकांना पेढे भरुन आतिशबाजी करत जल्लोष करण्यात आला आहे. टायगर इज बॅक, अरे कोणाला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा देत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश गिरी महाराज, शिवसेना तालुकाप्रमुख रामचंद्र रेड्डी येताळकर, माझी पंचायत समिती सभापती तथा तालुका संघटक मारुती कागेरू, बालाजी बनसोडे शहर संघटक राजू श्रीरामाने युवा सेना तालुकाप्रमुख यश मोकलीकर ज्येष्ठ शिवसैनिक गणपत कात्रे प्रकाश घागळे सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते गणेश गिरी यांनी शिवसेनेचा ढाण्या वाघ बाहेर आल्याची प्रतिक्रिया दिली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसैनिकांनी सुडाचे राजकारण सुरु  असल्याचा आरोप केला. रामचंद्र रेड्डी येताळकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी सावध रहावे, सुषमा अंधारे यांनी तुम्हाला सळो की पळो करून सोडलं आहे, आता वाघ तुम्हाला सोडणार नाही. मारोती कागेरु यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, संजय राऊत यांच्या हेतूपरस्पर कारवाई करण्यात आली. जे देशभरात घडत आहे ते महाराष्ट्रात घडत आहे. आमच्याविरोधात बोलायचं नाही, तो नियम कुठून काढला आहे? हा हुकूमशाहीला धक्का आहे. न्यायदेवतेनं आम्हाला न्याय दिला आहे.