कोल्हापूर: वडील आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. कोल्हापूरमध्ये एका मुलाने चक्क आपल्या वडिलांना जिवंत जाळून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना कागल तालुक्यातील एका गावात घडली. या घटनेनं संपूर्ण तालुका हादरुन गेला आहे. तर वडील गंभीररीत्या जखमी झाले आहेत. वडील शौचालयात गेले असता मुलाने बाहेरुन कडी लावली आणि त्यांना रॉकेल टाकून पेटवून दिल.

वडिलांचा जीव घेण्याचा कट मुलाने का रचला, याच कारणही समोर आल आहे. मालमत्तेच्या वादातून मुलाने वडिलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. मुलगा शिवाजी हजारे आणि शिवाजीची पत्नी सरला हजारे यांनी मिळून हा हत्येचा कट रचला होता. पण या जीवघेण्या हल्ल्यातून देवबा हजारे अगदी थोडक्यात बचावले. त्यांचा जीव वाचला असला तरी सध्या ते गंभीररीत्या जखमी झालेले आहेत. याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे.