नळवंडी नाका ते चिंचोली माळी दहिफळ नाळवंडी सह आधी परिसराला जोडणारा रस्ता अत्यंत खराब झाला असून सदरील रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी आज या भागातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर थाळीनात आंदोलन करत मोर्चा काढला. या मोर्चामध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात संख्या होती चिंचोली माळी,दहिफळ, नाळवंडी, लक्ष्मी तांडा, काळेगाव, या परिसरातील नागरिकांना खराब रस्त्यामुळे त्रासाला सामोरे जावे लागते. रस्ता दुरुस्तीसाठी अनेक वेळा निवेदन देण्यात आले मात्र याची दखल संबंधित विभागाने घेतली नसल्याने आज या भागातील नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून थाळीनाद मोर्चा काढल. या मोर्चामध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात संख्या होती आपल्या मागण्यांचे निवेदन आमदार संदीप क्षीरसागर व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा नसता या रस्त्यासाठी आमरण उपोषण करण्याचा इशारा या गावातील महिलांनी व नागरिकांनी दिला आहे .