रत्नागिरी : सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना समाजातील निराधार, गरीब कुटुंब मात्र या आनंदापासून दूर असतात. प्रत्येक मुलांन, व्यक्तींना दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी कारवांचीवाडी येथील सम्यक नगरमधील रहिवाशी पुढे सरसावले आहेत. दिवाळी निमित्त निवळी येथील माहेर संस्थेतील निराधार मुलांना फराळ पाकिट वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी दिवाळी फराळ मिळालेल्या मुलांनी कृतज्ञता व्यक्त केली. व माहेर संस्थेचे प्रमुख सुनील कांबळे यांनी आभार मानले. 

समाजातील सर्व घटक आनंदाने दिवाळी साजरी करत असताना, तालुक्यातील निराधार मुले दिवाळीच्या आनंदापासून वंचित राहू नये म्हणून कारवांचीवाडी येथील सम्यक नगरमधील सम्यक संबुद्ध मंडळाच्या संकल्पनेतून व पुढाकाराने दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. यावेळी विजय जाधव, विलास तायडे, अशोक तांबे, डी. एम.पवार, सतिश तायडे, विलास जाधव, राजू जाधव आदी उपस्थित होते.