रत्नागिरी : रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावर नाणीज गावाजवळ कशेळी पुलानजीकच्या वळणावर रात्रीच्या दरम्यान रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या बाजुपट्टीवर घेतल्याने कलंडून अपघात झाला. या अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत पाली पोलीस दूरक्षेत्रात करण्यात आला आहे.

या अपघाता संदर्भात पाली पोलीस दूरक्षेत्रातुन मिळालेली माहिती अशी की, रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर नाणीज गावानजीकच्या कशेळी पुलाच्या वळणावर रात्री १.३० वाजण्याच्या दरम्यान रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या एसटी बस (क्रमांक एमएच १४ बीटी-२२२०) घेऊन चालक दौलत विजयसिंग खाडे आला असता त्याचे कशेळी पुलाच्या वळणावर बसवरील नियंत्रण सुटून वळनावर रस्त्याचे विरुद्ध दिशेला जाऊन रस्त्याचे बाजूपट्टीचे खाली रस्त्याचे डोंगर भागाचे बाजूस कलंडून अपघात झाला आहे. या अपघाताची खबर एसटी बस वाहक बाळासाहेब भीमराव पवार यांनी दिली आहे.

या अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत पाली पोलीस दूरक्षेत्र येथे करण्यात आली असून अधिक तपास पाली पोलीस दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष कांबळे, पोलिस नाईक राकेश तटकरी हे करीत आहेत.