रत्नागिरी : पावस मार्गावरील फिनोलेक्सफाटा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एका दुचाकीस्वराचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी रात्री पावणेनऊ वाजता झाला.  

रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथील स्मितेश दिलीप जोशी (वय 28) हा आपला मित्र प्रसाद सुधीर राऊळ (वय 25) याच्यासमवेत पावस येथून रत्नागिरीच्या दिशेने येत होता. यावेळी बासीन रहीम भट्टीवाले (वय 24) हा रत्नागिरीतून गावखडी येथील आपल्या गावी जात होता. रविवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास फिनोलेक्स कंपनी फाटा येथे एका तिसऱ्या दुचाकी स्वाराने हूल दिल्यानंतर स्मितेश जोशी व बासीन भट्टीवाले या दोघांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर तिघांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारदरम्यान उपचारादरम्‍यान स्मितेश जोशी याचा मृत्यू झाला. तर बाशिंग भट्टीवाले व प्रसाद राऊळ हे गंभीर जखमी झाले आहेत.

स्मितेश जोशी हा मूळचा काळबादेवी येथील असून सध्या उद्यमनगर येथे राहत होता. मुंबई येथे कामानिमित्त वास्तव्याला असलेला स्मितेश दिवाळी सणासाठी दोन दिवसापूर्वी आपल्या गावात काळबादेवी येथील गावी आला होता. पेशाने इंजिनियर असलेला स्मितेश मुंबईतून परदेशात नोकरीसाठी जाणार होता. परंतु काळाने त्याच्यावर अचानक घाला घातला.